Wednesday, September 15, 2010

असतील नसतील तेवढे सगळे पुतळे क्रशर मधून काढावेत .....ती सामग्री लोकोपयोगी बांधकामासाठी वापरावी .पुतळ्यांची जागा मोकळी करावी ..पक्षांची सोय नवीन झाडे लावून आणि जगवून करावी . हे सर्व लोकोत्तर आत्मे संतुष्ट होतील ...(फक्त मायावतींच्या पुतळ्यांचा निर्णय त्यांच्या नंतर घ्या ).मंडळी तुम्हाला काय वाटते?

या ही पुढे जावून मला असे वाटते कि जर पुतळे क्रशर मधून काढताना जर समर्थक आडवे येत असतील तर ती कारवाई शासनाने ताबडतोब थांबवावी आणि त्या त्या समर्थकांच्या ताब्यात ते पुतळे द्यावेत जयंती पुण्यतिथी ऐवजी हे पुतळे रोज समर्थकांनी धुवून काढावेत..त्यांच्या देखभालीचा खर्चही समर्थकांना उचलावयास लावावा .तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्या समर्थकांच्या वर सोपवावी सोबत इशाराही द्यावा कि सुरक्षा नीट ठेवावी .हलगर्जीपणा झाल्यास तो समर्थकांवर अजामीनपात्र गुन्हा ठरेल .तसेच समाज कंटकानी पुतळ्याची विटंबना केल्यास त्या घटकांच्या सोबत या समर्थकानाही तितकेच जबाबदार धरावे. यातून वाचणारा खर्च देशावर झालेले परकीय कर्ज भागविण्यासाठी वापरावा .