Tuesday, January 19, 2010

प्रिय बाबा !



काही माणसं वादळ होण्याची गर्जना करतात
पण साधी वावटळ ही होत नाहीत ,
काही जण वादळ होण्याचा , झंजावाती वेगाने वाहण्याचा संकल्प करतात
पण कालौघात स्वताच उन्मळून पडतात
काहीना वादळ ही व्हायचं नसतं आणि कोसळायचही नसतं ,
कडे कडेने दहाजण चालून गेलेल्या वाटेवरून
काठी टेकत चाचपडत चालत राहतात ..
'न पडता एकदाचे पार पडलो बुवा!' ....या समजुतीत !
तत्ववेत्याच्या अविर्भावात आपले शहाणपण
जगाला सांगतात हे खुळे...पांगळे!
पण बाबा ! तुम्ही वादळं थेट अंगावर घेत
त्यांना जीवलगाप्रमाणे कडकडून भिडत,त्यांना सोबत घेवून चालत राहिलात
वा !...ते चालणं काय डौलदार होतं...नुसतं बघत राहावं!!
त्या चालीत होता सत-असत ,नित्य -अनित्य ,सुख- दुक्ख
आशा -निराशा,हास्य- वेदनेचा ,प्रेम- पीडेचा
स्वानुभूत ठोक ताळेबंद ....
बघता बघता तुम्हीच महाकाय वादळ झालात
आणि आम्हाला 'किमान छोटीशी झुळूक तरी व्हा रे !'
म्हणत हेलकावे देत राहिलात
बाबा ! मी झुळूक झाले.. आता वादळही व्हायचय मला
पण हेलकावा देणारे तुम्ही मात्र ...
दूरस्थ तार्यात जाऊन गम्मत पहात बसलात !
आता मी कशी काय होणार वादळ ..!


Friday, January 15, 2010

काकू, मी वेडी नाही ना हो !


काकू मी वेडी नाही ना हो !..ही अदिती मला वेडी म्हणते .....साडे तीन वर्षाची अनुष्का किंचाळत माझी साक्ष घेत होती .
"हो काकू ती वेडीच आहे..."अदिती खात्रीलायक बातमी पुरवत होती .
हा सगळा सीन चालू होता तिसर्या आणि चौथ्या मजल्याच्या जिन्यावर .तिथे फारशी वर्दळ नसते .कारण इमारत पाच मजली असल्याने लिफ्ट चा वापर होत असतो .मग या छोट्या मुली जिन्यावर भातुकली पासून सर्व खेळ मांडत असतात .आणि मी अधून मधून त्यांच्यात घुसत असते. त्यानाही आता माझी सवय झाली आहे .मग शाळेच्या गमती जमती, गाणी ,रुसवे फुगवे सारं त्या माझ्याशी शेअर करतात .
आजही बहुदा काहीतरी झालं असावं.
सांगा ना काकू ! मी वेडी आहे का हो ! अनुष्का अदितीच्या अगावर धावून जात म्हणाली .आता सूर त्राग्या ऐवजी रडवेला झाला.
मी तिला माझ्याकडे ओढून घेत म्हटलं," छे ...छे ..अनुष्का तर एकदम शहाणी आहे ." ती माझ्या कुशीत घुसून आता मुसमुसू लागली .
"अजि....बात नाही काकू !....ती अगदी वेडी आहे.असं टीचरच म्हणाली ....म्हणाली की नाही .मी खोटं बोलतेय ग अनुष्का !.. "अदिती गुरकावून म्हणाली .तिला अनुष्काचं असं माझ्या पोटाशी बिलगणं अजिबात आवडलं नव्हतं .ही लहान मुलं फार पझेसिव असतात .
मी हळूच खुण करून अदितीला विचारलं 'काय झालं? ' तिने दिलेला तपशील असा होता.त्यांच्या वर्गात त्यांना काही तोंडी प्रश्न विचारले होते .अनुष्काने दिलेली उत्तरे अशी होती .
स्वयंपाक कोण करतं?
आजी .
तुला जेवायला कोण भरवतं?
बाबा
तुझा अभ्यास कोण घेतं?
आजी .
अंघोळीला कोण घालतं? तुला नटवतं कोण ?
बाबा .
तुला खेळणी कपडे कोण आणतं?
आई .
तुला बागेत ,फिरायला कोण नेतं?
आई .
अदिती मधेच म्हणाली," काकू ,टीचर हिला करेक्ट उत्तर सांगत होती .पण ही ऐकतच नव्हती.म्हणते कशी बाबाच जेवण भरवतात आणि अंघोळीला घालतात .टीचर राईट असते न काकू ! ही टीचरचं ऐकतच नव्हती ..आहे की नाही काकू ही वेडी !"
खरं तर अनुष्काने बरोबर उत्तरे दिली होती .तिची आई सकाळी लवकर कामावर जायची आणि तिला यायला उशीर व्हायचा .बाबा उशिरा जायचा आणि लवकर यायचा .त्यामुळे छोट्या अनुष्काकडे आई पेक्षा आजी आणि बाबा जास्त लक्ष द्यायचे .तिची आई ती कसर तिच्या सुट्टीच्या दिवशी तिला बागेत नेवून,तिचे भरपूर लाड करून भरून काढायची .
"अहो काकू,असं वेड्यासारखा उत्तर देतात का पण ! " अदितीच्या दातातून तिचा मुद्दा काही सुटत नव्हता .
अनुष्का मला म्हणाली ,"काकू, आजी सांगते ,खोटं बोललं की देव पाप देतो .खोटं बोलायचं नसतं ना !"
मी टीचर चूक की आजी आजी चूक की अनुष्का चूक हे उत्तर देण्याच्या फंदात न पडता .अनुष्का खरं बोलल्यामुळे तिला पाप लागणार नाही ! असा पलायनवादी सूर काढून वातावरण शांत केलं. थोड्याच वेळात त्यांचा वाद मिटला आणि त्या छान खेळू लागल्या .माझ्या डोक्यात मात्र प्रश्नांचे मोहोळ उठले .स्त्री कामासाठी बाहेर पडू लागली .तिच्या कामाच्या स्वरुपात कालानुरूप बदल होत चालले आहेत तरी समाजाची मानसिकता का बदलत नाही ? शिक्षण व्यवस्थेत बदल का होत नाहीत ?अनुष्काने दिलेले उत्तरही बरोबर असू शकते हे कधी व्यवस्था स्वीकारणार ?..... मंडळी तुम्हाला काय वाटते ?...स्वाती ठकार

Wednesday, January 13, 2010

का लागतात काही नेत्यांना बुआ आणि बाबा !

आजकाल राजकीय नेते आणि बाबा यांच्या स्नेह संबंधावर बरेच जण उघड बोलू लागले आहेत .हे चांगलेच आहे .पुरोगामी महाराष्ट्राने जादूटोणा चमत्कार याला खरं तर कधीच थारा दिला नाही .फुले, शाहू ,आणि ज्या राज्यावर गांधींचे मनापासून प्रेम होते. तेथे संतानी भागवत धर्माचा प्रसार केला .बारकाईने पाहिल्यास एकेश्वरवाद संतानी रुजवला .सर्व संतानी चमत्कार आणि भोंदू पणाला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले .मग संतांच्या जीवनाला चमत्कार कुणी चिकटवले ?
हे तथाकथित बुद्धीजीविनी चिकटवले. असे का बरे व्हावे?सुरुवातीला संताना विरोध करून पहिला ? पण न संतानी भूमिका बदलली न त्यांच्या अनुयायांनी ! साध्या सोप्या बोली भाषेत अध्यात्म उलगडून दाखवणारे संत समाजाला भावले .जी दारे बंद होती ती भक्तीची जी दारे बहुजन समाजासाठी बंद होती ती संतानी धाडधाड उघडली .स्वताचा उद्धार स्वत करा ही संतांची शिकवण होती त्यांनी चमत्काराऐवजी स्वसाधना ,कर्मयोग आणि अनुभूती प्रमाण मानली .संतांच्या शिकवणी मुळे समाजाचे एकाच वेळी रंजन आणि प्रबोधन दोन्ही होत होते . त्यामुळे संत लोकप्रिय झाले .समाज शक्तीचा दबदबा सर्वकालीन आहे.तेव्हा त्यांची लोकप्रियता आणि प्रभाव मिटवू न शकल्याने त्यांच्या मागे चमत्कार चिकटवून ,त्यांना देवत्व बहाल करून त्यांच्या मूळ शिकवणीपासून लोकांना दूर नेण्यासाठी हि कारस्थाने सुरु झाली आणि ती काही अंशी यशस्वीही झाली.
परंतु महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय भागवत धर्माला चिकटून राहिला .मग काही बुद्धीजीविनी संतांची वाटणी करून घेतली आणि त्यांच्यावर वास्तवतेच्या नावाखाली चिखलफेक केली . दरम्यान या बुद्धीजीविंच्या प्रमाणे राजकारण्यांना ही लोकशाही व्यवस्थेत लोकमताची आवश्यकता वाटू लागली आणि मग बुवा आणि बाबांचा उगम झाला .श्रीलाल शुक्ल या हिंदी लेखकाने त्यांच्या राग दरबारी या संग्रहात निवडणुका जिंकण्याचे तीन प्रकार सांगितले आहेत .त्यातील एक प्रकार म्हणजे या बुवा आणि बाबांची मदत .
हे बुवा आणि बाबा भगवतगीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधिष्ठित पद्धतीने मांडून सर्व सिद्धांत स्वताच्या सोयीनुसार मोडून तोडून निरुपण करतात .भक्त यांच्या जाळ्यात अडकतात .अशा बुवा आणि बाबांचे चेले मग गावोगावी बाबांचे गुणगान गावू लागतात .मग काही नेते यांच्याशी सुत जमवतात .आणि श्रद्धेचा बाजार सुरु होतो . काही काळ लोकोपयोगी कामे होतात .जागा शासनाची ,खर्च लोकांचा ,कार्यकर्ते लोकातूनच येतात मग कार्यकर्त्यांची वर्गवारी होते .कष्टाळू ,भावूक कार्यकर्ते हरकामे होतात .बलदंड कार्यकर्ते विरोध करणाऱ्यांच्या अंगावर सोडता येतात.
तुम्ही म्हणाल नेत्यांचा संबंध कसा काय येतो ?निवडणुकीच्या आधी या बुवा, बाबांच्या सत्संगात हे नेते कपडे उचलण्या पासून सर्व कामे करतात .भक्त भारावून जातात. नेता आपल्या श्रद्धास्थानाची किती सेवा करतो ! मग हा बुवा चमत्कार (हात चलाखी ) करून ईश्वराचा प्रसाद म्हणून एखादी चेन किंवा अंगठी या नेत्याला देतो .माग चेले खाजगीत प्रचार करतात कि करतात ईश्वराने हा नेता निवडला .भावूक लोक फसतात .अर्थात ज्यांना लोकमत मिळत नाही असेच नेते अशा भानगडी करतात .महाराष्ट्रात हे लोण आजकाल फार पसरत चालले आहे .ही बाब मात्र चिंतेची आहे .काही नेते, खेळाडू , अभिनेते, अन्य कलाकार हा झटपट लोकप्रियतेचा मार्गअंगिकारू पाहतात . कठोर साधनेने यश मिळते हे सत्य त्यांच्यापासून कोसभर दूर असते हेच खरे .....स्वाती ठकार

Saturday, January 9, 2010

मुझे भी कुछ कहना है !



मैं दो बच्चों की माँ हूँ . बच्चों की परवरिश के दौरान मैंने भी वो सारी कठिनाइयाँ उठाई है .उन सारे तनावों का सामना किया जो कमाऊ माएँ कराती है .मैं कोलेज में पढ़ाती थी और मेरा अपना बड़ा बच्चा ढंग से नहीं पढ़ता था .स्कूल का नाम लेते ही उसके पेट में दर्द शुरू होता था .एक बार उसने पूरा पेपर खाली छोड़ दिया .वजह पूछने पर बताया ,वह खिड़की के पास बैठा था .पेड़ की टहनी खिड़की के पास थी .उस टहनी पर एक बड़ी चिड़िया छोटी चिड़िया के ऊपर बैठ गयी थी .बेचारी वो छोटीवाली मर जाती ना ! इसलिए पूरा वक्त वो उसे वहां से हकाल रहा था .मैंने आराम से सुन लिया .उसे बताया " बेटा ! तुम्हे तो ३० में से दो मार्क मिले है .तुमने एक प्रश्न और उसका उत्तर सही लिखा .congrats ! "मैं जानती थी उस वक्त वो जो कुछ पढ़ रहा है उस से ज्यादा चिड़िया ,पेड़ ,वातावरण देखना जरुरी है .मेरी सहेलिया मुझे टोकती थी ,उनका मानना था अगर बचपन से सही तरह पढाई का महत्त्व नहीं बताया तो बच्चे हाथ से निकल जायेंगे .जब वो ५ वी कक्षा में गया मैंने नौकरी छोड़ दी और पूरा ध्यान बच्चों पर दिया .उन्हें बेहतरीन किताबों से रूबरू किया अच्छे नाटक दिखाए .सब्जी लाना ,बिल भरना बैंक में जाना,छुट्टियों में रिश्तेदारों में घुल मिल कर रहना ये सारी बातें सिखाई .आज बड़ा बेटा अच्छी नौकरी करता है .छोटा वाला इंजिनीअरिंग पढ़ रहा है .आज वो उन पर आये सारे तनाव आराम से झेल सकते हैं .