Wednesday, January 13, 2010

का लागतात काही नेत्यांना बुआ आणि बाबा !

आजकाल राजकीय नेते आणि बाबा यांच्या स्नेह संबंधावर बरेच जण उघड बोलू लागले आहेत .हे चांगलेच आहे .पुरोगामी महाराष्ट्राने जादूटोणा चमत्कार याला खरं तर कधीच थारा दिला नाही .फुले, शाहू ,आणि ज्या राज्यावर गांधींचे मनापासून प्रेम होते. तेथे संतानी भागवत धर्माचा प्रसार केला .बारकाईने पाहिल्यास एकेश्वरवाद संतानी रुजवला .सर्व संतानी चमत्कार आणि भोंदू पणाला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले .मग संतांच्या जीवनाला चमत्कार कुणी चिकटवले ?
हे तथाकथित बुद्धीजीविनी चिकटवले. असे का बरे व्हावे?सुरुवातीला संताना विरोध करून पहिला ? पण न संतानी भूमिका बदलली न त्यांच्या अनुयायांनी ! साध्या सोप्या बोली भाषेत अध्यात्म उलगडून दाखवणारे संत समाजाला भावले .जी दारे बंद होती ती भक्तीची जी दारे बहुजन समाजासाठी बंद होती ती संतानी धाडधाड उघडली .स्वताचा उद्धार स्वत करा ही संतांची शिकवण होती त्यांनी चमत्काराऐवजी स्वसाधना ,कर्मयोग आणि अनुभूती प्रमाण मानली .संतांच्या शिकवणी मुळे समाजाचे एकाच वेळी रंजन आणि प्रबोधन दोन्ही होत होते . त्यामुळे संत लोकप्रिय झाले .समाज शक्तीचा दबदबा सर्वकालीन आहे.तेव्हा त्यांची लोकप्रियता आणि प्रभाव मिटवू न शकल्याने त्यांच्या मागे चमत्कार चिकटवून ,त्यांना देवत्व बहाल करून त्यांच्या मूळ शिकवणीपासून लोकांना दूर नेण्यासाठी हि कारस्थाने सुरु झाली आणि ती काही अंशी यशस्वीही झाली.
परंतु महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय भागवत धर्माला चिकटून राहिला .मग काही बुद्धीजीविनी संतांची वाटणी करून घेतली आणि त्यांच्यावर वास्तवतेच्या नावाखाली चिखलफेक केली . दरम्यान या बुद्धीजीविंच्या प्रमाणे राजकारण्यांना ही लोकशाही व्यवस्थेत लोकमताची आवश्यकता वाटू लागली आणि मग बुवा आणि बाबांचा उगम झाला .श्रीलाल शुक्ल या हिंदी लेखकाने त्यांच्या राग दरबारी या संग्रहात निवडणुका जिंकण्याचे तीन प्रकार सांगितले आहेत .त्यातील एक प्रकार म्हणजे या बुवा आणि बाबांची मदत .
हे बुवा आणि बाबा भगवतगीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधिष्ठित पद्धतीने मांडून सर्व सिद्धांत स्वताच्या सोयीनुसार मोडून तोडून निरुपण करतात .भक्त यांच्या जाळ्यात अडकतात .अशा बुवा आणि बाबांचे चेले मग गावोगावी बाबांचे गुणगान गावू लागतात .मग काही नेते यांच्याशी सुत जमवतात .आणि श्रद्धेचा बाजार सुरु होतो . काही काळ लोकोपयोगी कामे होतात .जागा शासनाची ,खर्च लोकांचा ,कार्यकर्ते लोकातूनच येतात मग कार्यकर्त्यांची वर्गवारी होते .कष्टाळू ,भावूक कार्यकर्ते हरकामे होतात .बलदंड कार्यकर्ते विरोध करणाऱ्यांच्या अंगावर सोडता येतात.
तुम्ही म्हणाल नेत्यांचा संबंध कसा काय येतो ?निवडणुकीच्या आधी या बुवा, बाबांच्या सत्संगात हे नेते कपडे उचलण्या पासून सर्व कामे करतात .भक्त भारावून जातात. नेता आपल्या श्रद्धास्थानाची किती सेवा करतो ! मग हा बुवा चमत्कार (हात चलाखी ) करून ईश्वराचा प्रसाद म्हणून एखादी चेन किंवा अंगठी या नेत्याला देतो .माग चेले खाजगीत प्रचार करतात कि करतात ईश्वराने हा नेता निवडला .भावूक लोक फसतात .अर्थात ज्यांना लोकमत मिळत नाही असेच नेते अशा भानगडी करतात .महाराष्ट्रात हे लोण आजकाल फार पसरत चालले आहे .ही बाब मात्र चिंतेची आहे .काही नेते, खेळाडू , अभिनेते, अन्य कलाकार हा झटपट लोकप्रियतेचा मार्गअंगिकारू पाहतात . कठोर साधनेने यश मिळते हे सत्य त्यांच्यापासून कोसभर दूर असते हेच खरे .....स्वाती ठकार

2 comments:

  1. .महाराष्ट्रात हे लोण आजकाल फार पसरत चालले आहे .ही बाब मात्र चिंतेची आहे ..Swati'ji pan yala aaj-kkal cha tarun varga nakki virodh kartoy ani karel,tyamule he faarkaal chalnar nahi !

    ReplyDelete